शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचं मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:09 IST

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा ...

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा सवाल विचारला जात होता. अर्थातच चर्चेच्या केंद्रस्थानी भाजप आणि कदम घराण्याचे कट्टर विरोधक देशमुख होते. कारण कदम-देशमुखांचा दुरंगी सामना १९८५ पासून चालत आलेला. त्यामुळं आता काय होणार, हे विचारलं जाणं, स्वाभाविकच होतं. काँग्रेसनं विश्वजित यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि राष्टÑवादीनं पाठिंबा जाहीर केला. पण भाजपनं मागच्या बुधवारी पत्ते ‘ओपन’ केले... तेही अर्धवटच. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचं नाव पुढं करण्याची चाल भाजपनं खेळली. खासदार-चार आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनानं अर्जही भरला. त्यातून कार्यकर्ते रिचार्ज झाले... तयारीला लागले....पण अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेतली नेत्यांची भाषणं भाजपच्या चालीचा अंदाज देऊन जात होती. ‘पक्षानं कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्याच्याशी बांधील आहोत...’ असं प्रत्येकजण सांगत होता, अगदी देशमुखही! तो ‘कोणताही’ निर्णय म्हणजे काय होतं, हे आता समजलं! विशेष म्हणजे अर्ज गुरुवारी भरल्यानंतर रविवारपर्यंत देशमुख गटाची कोणतीच हालचाल दिसत नव्हती. ना सभा, ना बैठका, ना चर्चा! पलूस-कडेगावात नेहमी देशमुखांबोबत असलेले राष्टÑवादीचे अरुण लाडही ‘सोमवारनंतर बघू,’ असं सांगत होते. सोमवारी या नाट्याची अखेर झाली. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्र्यांचा सांगावा घेऊन आलेले. त्यांनी जिल्ह्याच्या कोअर कमिटीसह देशमुखांना निर्णय सांगितला... आणि अर्ज मागे घेण्यात आला. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावच्या पोटनिवडणुकीत भाजपने आर. आर. आबांच्या पत्नीला पाठिंबा दिला होता. तोही अर्ज भरण्याचं नाटक वगैरे न करता. मग इथं पाठिंबा द्यायचं ठरलंच होतं, तर अर्ज का भरला, आम्हाला तोंडावर का पाडलं, असा सवाल लढाईच्या तयारीत असलेले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते करणार नाहीत का? पण पक्षाचा उदोउदो आणि मार्केटिंग करण्याचा डाव आखलेल्या वरिष्ठांना ते कसं समजणार?पतंगरावांच्या निधनामुळे विश्वजित यांच्या पाठीशी सहानुभूती राहणार, हे भाजपला पक्कं माहीत होतं. शिवाय पुढील विधानसभा निवडणूक वर्षभरात होतेय. त्यामुळं वर्षभरात दोनदा शक्ती खर्च करण्यापेक्षा पुढच्यावेळीच ताकद लावावी, असं स्पष्ट मत भाजपमधल्या चाणक्यांनी मांडलं होतं. तेव्हाच सगळं ठरलं होतं... पण त्यातूनही संधी साधता येते का, हे पाहिलं गेलं.यादरम्यान पद्धतशीर वातावरण तापवलं गेलं. १९९६ मध्ये तत्कालीन आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पतंगराव कदम यांनी निवडणूक बिनविरोध केली नव्हती. हा मुद्दा उचलण्यात आला. तो सर्वदूर पसरवण्यात आला. आपण रिंगणात उतरणारच, असा शड्डू ठोकत कार्यकर्ते आणि समर्थकांना चेतवण्यात आलं. मधूनच ‘पालघर आम्हाला सोडा, पलूस-कडेगाव आम्ही सोडतो’, असा न चालणारा अतार्किक पत्ता टाकला गेला. दबावतंत्रात माहीर असलेल्या भाजपनं काँग्रेसला हवेवर ठेवलं. एकीकडं संग्रामसिंहांच्या भविष्यातील वाटचालीसाठी केलेली ही पेरणी होती, तर दुसरीकडं पक्षाचा उदोउदो करण्यासाठी मुद्दाम मिळवण्यात आलेली संधी होती.जाता-जाता : पलूस-कडेगावच्या राजकीय स्थितीचा नेमका अंदाज भाजपला आला. सहानुभूतीच्या लाटेत आपण टिकणार नाही, याची खात्री असल्यानंच इथं माघार घ्यायचं ठरलं. माघारीमुळं राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणेचा खर्च, वेळ आणि मेहनत वाचली, असा मेसेज जाईल, पक्षाची प्रतिमाही उंचावेल, असा अंदाज बांधला गेला. विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास आणि त्याच्या घरातला उमेदवार उभा असल्यास तिथं उमेदवार उभा न करण्याची परंपरा भाजपनंच पाळल्याचे नगारे वाजवायला सुरुवात झाली... याच मार्केटिंगसाठी होता सगळा अट्टहास!