शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

भाजपचं मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:09 IST

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा ...

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा सवाल विचारला जात होता. अर्थातच चर्चेच्या केंद्रस्थानी भाजप आणि कदम घराण्याचे कट्टर विरोधक देशमुख होते. कारण कदम-देशमुखांचा दुरंगी सामना १९८५ पासून चालत आलेला. त्यामुळं आता काय होणार, हे विचारलं जाणं, स्वाभाविकच होतं. काँग्रेसनं विश्वजित यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि राष्टÑवादीनं पाठिंबा जाहीर केला. पण भाजपनं मागच्या बुधवारी पत्ते ‘ओपन’ केले... तेही अर्धवटच. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचं नाव पुढं करण्याची चाल भाजपनं खेळली. खासदार-चार आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनानं अर्जही भरला. त्यातून कार्यकर्ते रिचार्ज झाले... तयारीला लागले....पण अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेतली नेत्यांची भाषणं भाजपच्या चालीचा अंदाज देऊन जात होती. ‘पक्षानं कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्याच्याशी बांधील आहोत...’ असं प्रत्येकजण सांगत होता, अगदी देशमुखही! तो ‘कोणताही’ निर्णय म्हणजे काय होतं, हे आता समजलं! विशेष म्हणजे अर्ज गुरुवारी भरल्यानंतर रविवारपर्यंत देशमुख गटाची कोणतीच हालचाल दिसत नव्हती. ना सभा, ना बैठका, ना चर्चा! पलूस-कडेगावात नेहमी देशमुखांबोबत असलेले राष्टÑवादीचे अरुण लाडही ‘सोमवारनंतर बघू,’ असं सांगत होते. सोमवारी या नाट्याची अखेर झाली. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्र्यांचा सांगावा घेऊन आलेले. त्यांनी जिल्ह्याच्या कोअर कमिटीसह देशमुखांना निर्णय सांगितला... आणि अर्ज मागे घेण्यात आला. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावच्या पोटनिवडणुकीत भाजपने आर. आर. आबांच्या पत्नीला पाठिंबा दिला होता. तोही अर्ज भरण्याचं नाटक वगैरे न करता. मग इथं पाठिंबा द्यायचं ठरलंच होतं, तर अर्ज का भरला, आम्हाला तोंडावर का पाडलं, असा सवाल लढाईच्या तयारीत असलेले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते करणार नाहीत का? पण पक्षाचा उदोउदो आणि मार्केटिंग करण्याचा डाव आखलेल्या वरिष्ठांना ते कसं समजणार?पतंगरावांच्या निधनामुळे विश्वजित यांच्या पाठीशी सहानुभूती राहणार, हे भाजपला पक्कं माहीत होतं. शिवाय पुढील विधानसभा निवडणूक वर्षभरात होतेय. त्यामुळं वर्षभरात दोनदा शक्ती खर्च करण्यापेक्षा पुढच्यावेळीच ताकद लावावी, असं स्पष्ट मत भाजपमधल्या चाणक्यांनी मांडलं होतं. तेव्हाच सगळं ठरलं होतं... पण त्यातूनही संधी साधता येते का, हे पाहिलं गेलं.यादरम्यान पद्धतशीर वातावरण तापवलं गेलं. १९९६ मध्ये तत्कालीन आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पतंगराव कदम यांनी निवडणूक बिनविरोध केली नव्हती. हा मुद्दा उचलण्यात आला. तो सर्वदूर पसरवण्यात आला. आपण रिंगणात उतरणारच, असा शड्डू ठोकत कार्यकर्ते आणि समर्थकांना चेतवण्यात आलं. मधूनच ‘पालघर आम्हाला सोडा, पलूस-कडेगाव आम्ही सोडतो’, असा न चालणारा अतार्किक पत्ता टाकला गेला. दबावतंत्रात माहीर असलेल्या भाजपनं काँग्रेसला हवेवर ठेवलं. एकीकडं संग्रामसिंहांच्या भविष्यातील वाटचालीसाठी केलेली ही पेरणी होती, तर दुसरीकडं पक्षाचा उदोउदो करण्यासाठी मुद्दाम मिळवण्यात आलेली संधी होती.जाता-जाता : पलूस-कडेगावच्या राजकीय स्थितीचा नेमका अंदाज भाजपला आला. सहानुभूतीच्या लाटेत आपण टिकणार नाही, याची खात्री असल्यानंच इथं माघार घ्यायचं ठरलं. माघारीमुळं राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणेचा खर्च, वेळ आणि मेहनत वाचली, असा मेसेज जाईल, पक्षाची प्रतिमाही उंचावेल, असा अंदाज बांधला गेला. विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास आणि त्याच्या घरातला उमेदवार उभा असल्यास तिथं उमेदवार उभा न करण्याची परंपरा भाजपनंच पाळल्याचे नगारे वाजवायला सुरुवात झाली... याच मार्केटिंगसाठी होता सगळा अट्टहास!